Followers

Monday, 28 September 2020

अधिक मासाचे शास्त्रीय महत्त्व ( adhik masache shatriy mahatva )

                            

अधिक मासाचे शास्त्रीय महत्त्व

अधिक मासाचे शास्त्रीय महत्त्व


                                  
मागच्या लेखात म्हंटल्या प्रमाणे प्रत्येक धर्माला शास्त्राचा आधार असतो. आणि हेच शास्त्रीय महत्व जगासमोर आणण्या साठी हा लेखप्रपंच. जुन्या पिढीकडून धर्माचे फक्त पौराणिक महात्माच आजपर्यंत समोर आले. त्यामुळे आज कालच्या शिकलेल्या मुलांनां ह्या अंधश्रद्धा वाटू लागल्या. पण ह्या मुलांना हे कळत नाही कि सायन्स फक्त Re -search ( परत शोधणे ) करत. विज्ञान शोध लावू शकतो पण उपत्ती करू शकत नाही. कारण शेवटी विज्ञानाला मर्यादा येतात. असो. आता आपण बघुयात अधिकमासाची खगोलशात्रीय उत्पत्ती. 

 


अधिक मास हा पूर्णपणे खगोलशास्त्रीय आहे. हा मास कसा येतो हे समजून घेण्यासाठी आपल्याला " सूर्यसंक्रांत " आणि " चांद्रमास " या दोन्ही गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे. 




१) सूर्यसंक्रांत :- आपल्याला माहित आहे कि सूर्य दररोज सरासरी एक अंश पुढे सरकतो. म्हणजेच तो तीस दिवसात ( एक महिन्यात ) ३० अंश पुढे सरकतो. जोतिष शास्त्रानुसार १ रास हि ३० अंशाची असते. याचाच अर्थ सूर्य १ महिन्यात १ रास पुढे सरकतो. यालाच " सूर्यसंक्रांत " असे म्हणतात. उदाहरण द्यायचे झाले तर हिंदू पंचांगानुसार जेंव्हा सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो यालाच आपण " मकरसंक्रांत " असे म्हणतात. सूर्यसंक्रांतीचा हा कालावधी किमान २९ दिवस १० तास ४८ मिनिटे ते कमाल ३१ दिवस १० तास ४८ मिनिटे एवढा असू शकतो. 


२) चांद्रमास :- " चांद्रमास " हा शुद्ध प्रतिपदेला सुरू होऊन अमावास्येला संपतो. चांद्रमास हा किमान २९ दिवस ५ तास ४४ मिनिटे ते कमाल २९ दिवस १९ तास ३६ मिनिटे असतो.

चांद्रमास
चांद्रमास

 

आता आपल्या लक्षात आलेच असेल कि " चांद्रमास " हा " सूर्यमासापेक्षा " म्हणजेच " सूर्यसंक्रतीपेक्षा " लहान असतो. प्रत्येक सूर्यसंक्रतीमध्ये चांद्रमास हा येतोच पण प्रत्येक चांद्रमासात सूर्यसंक्रात होईलच असे नाही. कधीतरी अशी स्थिती येते की एखाद्या चांद्रमासात एकही सूर्यसंक्रांत होत नाही. या चांद्रमासाला ‘' असंक्रातीमास " म्हणजेच ‘' अधिक मास " म्हटले जाते. 



चैत्रापासून आश्विन महिन्यांपर्यंतचा कोणताही एक महिना अधिक मास म्हणून येऊ शकतो. कारण या महिन्यांतच सूर्याची गती मंद असते, व त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत जायला जास्त वेळ लागतो. क्वचित कार्तिक वा फाल्गुन महिन्यातही अधिक मास येतो. त्या वर्षी एकाच नावाचे दोन चांद्र महिने असतात, अगोदरचा अधिकमास आणि नंतर लगेच येणारा महिना हा निजमास. जसे कि यावर्षीचे उदाहरण बघितले तर जो आता चालू आहे तो अधिक अश्विन आणि नवरात्री पासून जो सुरु होईल तो नाव अश्विन म्हणजेच आपला नेहमीच अश्विन महिना. एखादा विशिष्ट महिना अधिकमास आला की १९ वर्षांनंतर तोच महिना अधिकमास म्हणून येऊ शकतो. म्हणजेच आता परत साधारण १९ वर्षांनी परत अधिक अश्विन महिना येईल . 




चला आता पुढच्या लेखात बघुयात अधिक महीन्याचे वाण, त्याची माहिती, आणि हा अधिक महिना आपल्याला काय शिकवतो ते . तुम्हाला माझा ब्लॉग , त्यातील माहिती कशी वाटते ते मला comment करून नक्की सांगा. आणि तुमच्या मित्र मैत्रिणी व नातेवाईकांना हा ब्लॉग शेअर करायला विसरू नका. 



5 comments:

  1. खूपच छान माहिती आहे आधी धार्मिक आणि आता शास्त्रीय कारण दिल्यामुळे आपण कीती पूर्वीपासुन प्रगल्भ आहोत ते दिसते आहे.

    ReplyDelete

फावल्या वेळात काय करायचं …..

फावल्या वेळात काय करायचं ….. महाभारतात एक सुंदर कथा येते ती अशी की, जेव्हा पांडवाना बारा वर्षाचा वनवास होतो. पांडव आणि द्रौपदी अव्दैतवनात रा...